"निंदकाचे घर असावे शेजारी" या संतशिरोमणी श्री. तुकाराम महाराजांच्या ओळी स्वानुभवातून आल्या आहेत. निंदकाने केलेल्या निंदेमुळे आपण ध्येयप्राप्ती साठी योग्य मार्गक्रमण करत आहोत का? हे तपासून पाहण्याची ती संधी मिळालेली असते. अपयश लाभल्यामुळे खूप वेळा निंदा सहन करावी लागते, या संक्रमणाच्या काळात निंदकाला हितचिंतक न मानता आपण त्याच्याबद्दल मनात अढी धरून बसतो. स्वाभिमानाला पोहोचलेल्या धक्कयामुळे त्या टीकेला होकारार्थी वळण देण्यासाठीच्या मानसिकतेची अतीव कमतरता बहुतांशी लोकांमध्ये दिसून येते.
व्यक्ती जितकी महान असते तितकी अधिक निंदा तिच्या वाट्याला येते. हे निंदारूपी टाकीचे घाव व्यक्तीला देवत्वाकडे घेऊन जातात, पण तो मान-मरातब मिळाल्यावर प्रशंसकांबरोबर निंदक ही हातात हात घालून त्यांच्यासोबत आलेले असतात. मुद्दाम टीकाकार हा त्याच्याजवळ असणारा शब्द वापरण्याचं टाळलं कारण टीकाकार हा उत्प्रेरक/कॅटॅलीस्ट आहे जो चुका-दोष हा अनावश्यक भाग बाजूला काढून बाकी त्याच्या व्याखेनुसार काम करतो. तो ज्याच्यावर टीका करायची आहे त्याच्या यशापशाचा लेखा-जोखा त्यानं समोर ठेवलेला असतो, त्यावरच तारतम्य बाळगून तो भाष्य करत असतो. आजकाल जो उठतो तो टीकाकाराची भूमिका बजावतो आहे, पण हे टीकाकाराचं कातडं पांघरलेले निंदक आहेत, त्यांची भडक निंदाच याची जाणीव करून देत आहे.
सामाजिक प्रसारमाध्यमांमुळे याला मोकळं रान मिळालं आहे. नरेंद्र मोदी असोत की राहुल गांधी असोत, केजरीवाल असोत की कन्हैया कुमार; यांच्या समर्थकांनी त्यांची निंदा केली त्यांचे समर्थक यांची निंदा करायला कंबर कसून तयार. याला सध्याच्या बोलीभाषेत ट्रोलिंग म्हटलं जातं आणि हे करत बसतात ते ट्रोलर्स. चुका झाल्या तर तीव्र शब्दांत खरडपट्टी नक्कीच काढावी, अपराध घडला असेल तर कडक शासन करण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था आहेच पण स्तर सोडून निंदा करण्याचा कसोशीने प्रयत्न का? ही घाणेरडी मानसिकता संसर्गजन्य रोगासारखी फैलावताना दिसत आहे. याला अटकाव घालण्याची तसदीही कुणी घेत नाही.
वैचारिक मतभेद असतीलही, का असू नयेत? पण वैचारिक मतभेद असणाऱ्यांनी परस्परांना शत्रू मानून संधी मिळेल तेंव्हा पोटभर निंदा करून एकमेकांवर तोंडसुख घेण्याचा आटोकाट प्रयत्न चाललेला असतो. साधक-बाधक चर्चा करण्याची वृत्ती, समोरच्याची बाजू ऐकून घेण्याचा धीर या गोष्टींचा या मंडळींच्याकडे अभावच आहे अशी दूषित मानसिकता घेऊन कसं जगता येतं हे त्याच निंदकांना माहीत! आणि हे सगळं समोरासमोर करण्यासाठी अजिबात वेळ नाही, पण दिसला बॉक्स की द्या कॉमेंट, टाका पोस्ट...प्रातःकाळी हरिनामाऐवजी आज कुणाला आणि कसं ट्रोल करावं हाच विचार करत असतील बहुतेक. ऑफिस मधला रिकामा वेळ असो, जेवणाची सुट्टी असो सामाजिक प्रसारमध्यमांवर काही लोक तीन प्रहरी हेच काम करताना आढळतात, यांना केवळ ब्रेकिंग न्युज मिळण्याचा अवकाश असतो. जेष्ठ नागरिकांसोबत तरुणही त्याच मार्गाला लागले आहेत. या उद्देशासाठी अशा समविचारी जनांचे समूह होताना पहायला मिळत आहेत. यासाठी या लोकांना स्वतःच्या वैचारिक, बौद्धिक पात्रतेचा विसर पडल्याचं जाणवत आहे.
हे सत्कार्य करण्यासाठी फावला वेळ खर्ची घालवण्यापेक्षा आपले छंद जोपासणे, आपल्याजवळचे ज्ञान या समूहांतून नव्या पिढीला देणे, विचारांचे आदान-प्रदान करणे, सामाजिक प्रश्नांवर काम करण्यासाठी एकत्र येणे इ. स्वप्नवत गोष्टी सामजिक प्रसारमाध्यमांवरील समूहांमधून कधी साध्य होतील? विज्ञानाच्या प्रगतीमुळे मिळालेल्या या सामाजिक माध्यमांसारख्या अमूल्य देणग्यांचा वापर स्वहितार्थ तथा जनहितार्थ करणार का? तर कधी करणार? हा प्रश्न स्वतःला विचारण्याची हीच वेळ आहे. ती दवडु नये असं वाटतं.
सामाजिक प्रसारमाध्यमांमुळे याला मोकळं रान मिळालं आहे. नरेंद्र मोदी असोत की राहुल गांधी असोत, केजरीवाल असोत की कन्हैया कुमार; यांच्या समर्थकांनी त्यांची निंदा केली त्यांचे समर्थक यांची निंदा करायला कंबर कसून तयार. याला सध्याच्या बोलीभाषेत ट्रोलिंग म्हटलं जातं आणि हे करत बसतात ते ट्रोलर्स. चुका झाल्या तर तीव्र शब्दांत खरडपट्टी नक्कीच काढावी, अपराध घडला असेल तर कडक शासन करण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था आहेच पण स्तर सोडून निंदा करण्याचा कसोशीने प्रयत्न का? ही घाणेरडी मानसिकता संसर्गजन्य रोगासारखी फैलावताना दिसत आहे. याला अटकाव घालण्याची तसदीही कुणी घेत नाही.
वैचारिक मतभेद असतीलही, का असू नयेत? पण वैचारिक मतभेद असणाऱ्यांनी परस्परांना शत्रू मानून संधी मिळेल तेंव्हा पोटभर निंदा करून एकमेकांवर तोंडसुख घेण्याचा आटोकाट प्रयत्न चाललेला असतो. साधक-बाधक चर्चा करण्याची वृत्ती, समोरच्याची बाजू ऐकून घेण्याचा धीर या गोष्टींचा या मंडळींच्याकडे अभावच आहे अशी दूषित मानसिकता घेऊन कसं जगता येतं हे त्याच निंदकांना माहीत! आणि हे सगळं समोरासमोर करण्यासाठी अजिबात वेळ नाही, पण दिसला बॉक्स की द्या कॉमेंट, टाका पोस्ट...प्रातःकाळी हरिनामाऐवजी आज कुणाला आणि कसं ट्रोल करावं हाच विचार करत असतील बहुतेक. ऑफिस मधला रिकामा वेळ असो, जेवणाची सुट्टी असो सामाजिक प्रसारमध्यमांवर काही लोक तीन प्रहरी हेच काम करताना आढळतात, यांना केवळ ब्रेकिंग न्युज मिळण्याचा अवकाश असतो. जेष्ठ नागरिकांसोबत तरुणही त्याच मार्गाला लागले आहेत. या उद्देशासाठी अशा समविचारी जनांचे समूह होताना पहायला मिळत आहेत. यासाठी या लोकांना स्वतःच्या वैचारिक, बौद्धिक पात्रतेचा विसर पडल्याचं जाणवत आहे.
हे सत्कार्य करण्यासाठी फावला वेळ खर्ची घालवण्यापेक्षा आपले छंद जोपासणे, आपल्याजवळचे ज्ञान या समूहांतून नव्या पिढीला देणे, विचारांचे आदान-प्रदान करणे, सामाजिक प्रश्नांवर काम करण्यासाठी एकत्र येणे इ. स्वप्नवत गोष्टी सामजिक प्रसारमाध्यमांवरील समूहांमधून कधी साध्य होतील? विज्ञानाच्या प्रगतीमुळे मिळालेल्या या सामाजिक माध्यमांसारख्या अमूल्य देणग्यांचा वापर स्वहितार्थ तथा जनहितार्थ करणार का? तर कधी करणार? हा प्रश्न स्वतःला विचारण्याची हीच वेळ आहे. ती दवडु नये असं वाटतं.
