शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

"राम" हैं

गीतकार: जावेद अख्तर (Javed Akhtar)
संगीत: ए. आर्. रहमान. (A.R. Rahman)

सीता:
पल पल है भारी वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई
आओ रघुवीर आओ, रघुपति राम आओ
मोरे मन के स्वामी, मोरे श्रीराम आओ
राम-राम जपती हूँ, सुनलो मेरे राम आओ
राम-राम जपती हूँ, सुनलो मेरे रामजी…
कोरस:
बजे सत्य का डंका, जले पाप की लंका
इसी क्षण तुम आओ, मुक्त कराओ
सुन भी लो अब मेरी दुहाई
पल पल है भारी, वो विपदा है आई..
मोहे बचाने अब आओ रघुराई।।
राम को भूलो, यह देखो रावण आया है
फैली सारी सृष्टि पर जिसकी छाया है।
रावण:
क्यों जपती हो राम राम तुम?
क्यों लेती हो राम नाम तुम?
राम राम का रटन जो यह तुमने है लगाया
सीता…. सीता तुमने राम में ऐसा क्या गुण पाया?

                                              ( स्रोत : साभार इंटरनेट)

सीता:
गिन पाएगा उनके गुण कोई क्या,
इतने शब्द ही कहाँ हैं
पहुँचेगा उस शिखर पे कौन भला,
मेरे रामजी जहाँ हैं!
जग में सबसे उत्तम हैं, मर्यादा पुरुषोत्तम है
सबसे शक्तिशाली हैं, फिर भी रखते संयम है
पर उनके संयम की अब आने को है सीमा
रावण समय है…माँग ले क्षमा
कोरस:
बजे सत्य का डंका, जले पाप की लंका
आए राजा राम, करें हम प्रणाम
संग आया लक्ष्मण जैसा भाई
पल पल है भारी, वो विपदा है आई..
मोहे बचाने अब आओ रघुराई।।
रावण:
राम में शक्ति अगर है, राम में साहस है तो
क्यों नहीं आए अभी तक वो तुम्हारी रक्षा को?
जिनका वर्णन करने में थकती नहीं हो तुम यहाँ
यह बताओ वो तुम्हारे राम हैं इस पल कहाँ??
सीता:
राम हृदय में है मेरे, राम ही धड़कन में हैं
राम मेरी आत्मा में, राम ही जीवन में हैं….
राम हर पल में है मेरे, राम है हर स्वास में
राम हर आशा में मेरी, राम ही हर आस में

                                                (स्रोत : साभार इंटरनेट)

मोहन भार्गव:
राम ही तो करुणा में है, शांति में राम हैं
राम ही है एकता में, प्रगती में राम हैं
राम बस भक्तों नहीं, शत्रु के भी चिंतन में हैं
देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं
राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं …(2)
राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं
मन से रावण जो निकाले, राम उसके मॅन में हैं …(2)
सीता:
पल पल है भारी, वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई।।
कोरस:
सुनो राम जी आए, मोरे राम जी आए
राजा रामचंद्रा आए, श्री रामचंद्र आए
राम जी आए, मोरे राम जी आए..हो…(2)
        २ एप्रिल २०२०. चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी. रामाचा जन्म इ.स.पूर्व ५११४ वर्षांपूर्वी झाला म्हणजे ही रामाची ७१३४ वी जयंती. आपल्या सिनेसृष्टीमध्ये आपल्या बहुतेक सर्व सण-उत्सवांवर आधारित गाणी आहेत. वर दिलेलं भलं मोठं गाणं जरी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर 'स्वदेस' (Swades) या सिनेमात दाखवलं असलं तरी ते आजच्या दिवशी त्याचं स्मरण हटकून होतं कारण या गाण्यामध्ये रामाचा गुणगौरव करण्यात आला आहे. थोर व्यक्ती/महापुरुषांचे गुणगान त्यांच्या जयंती-पुण्यतिथीला करणे ही आपली प्रथाच आहे. राम हे तर देवस्वरुप आहेत म्हणून रामभक्ती हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. 'स्वदेस' या चित्रपटात मूळचा भारतात वाढलेला, सुट्टी घेऊन एका खेडेगावात आलेला, जगातलं उच्चतम तंत्रज्ञान असणाऱ्या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा' (NASA) इथं काम करणारा युवक 'मोहन भार्गव'(शाहरुख खान) (Shahrukh Khan); 'नासा-खेडेगाव;दोन्ही एकदम भिन्न वातावरण आणि संस्कृती असणारी ठिकाणं; नासा मध्ये सतत वैज्ञानिक संशोधन करुन अल्पसंतुष्ट न राहता विश्वातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा छंद पण गावात पोट भरण्याचं काम करावं आणि जे चालत आलंय ते करावं "ठेविले अनंते" प्रमाणं जगावं ही वृत्ती, कामावरून सुट्टी घेऊन आल्यानंतर गाव आणि अमेरिका यातला फरक बघून त्याचं मन व्यथित होतं आणि त्यातून तो गावासाठी काय करतो हे दाखवलं आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे.
         सदर गाणं दसऱ्याच्या रामलीलेच्या प्रसंगी घेण्यात आलं आहे. उत्तर भारतात दसऱ्याच्या दिवशी रामलीला सादर होणं आणि रावण दहन याला मोठी परंपरा आहे. सणवार-उत्सव व जोडून येणाऱ्या रुढी-प्रथा पाळणं आपल्याकडं हौसेनं केलं जातं, मग त्या मागची भावना-विचार-हेतू पुढच्या पिढ्यांना समजेल वा न समजेल यांवर लक्ष दिलं जात नाही. मोहनच्या या गावातही अशीच परिस्थिती. रामलीलेतल्या भजनात कोरस म्हणावा आणि घरी जाऊन झोपावं, उद्या पुन्हा ये रे माझ्या मागल्या! अरे म्हणजे आम्ही आमचे सण साजरे करायचे नाहीत का, प्रथा- परंपरा पाळायच्या नाहीत का? "आमचेच" सण बरे दिसतात? तसं नाही. काय आहे की हा सिनेमा मोहन भार्गवच्या नजरेतून आपल्याला दिसतो. आपल्या मानलेल्या आईच्या ओढीनं अनोळखी गावात मोहन आला,  त्याच्या नजरेला अमेरिका आणि गाव यातली तफावत चांगलीच लक्षात येत जाते की गावात १८ पगड जाती म्हणून अस्पृश्यता जातीवाद बोकाळला आहे. ६० वर्षे झाली देश स्वतंत्र होऊन तरी मुलींना शाळेत पाठवलं जात नाही,अस्पृश्यांच्या मूला-मुलींना शाळेकडं बघायचीही सोय नाही. गावात अजूनही वीज नाही. ज्या उत्साहात गाव आपले सणवार -परंपरा-उत्सव साजरे करतं तो उत्साह मूलभूत सोयी-सुविधा, विकास करण्यासाठी कणभरही दिसत नाही. म्हणून या गाण्यातही मोहन अस्वस्थ होताना दिसतो. राम हे सीतेचे पती आहेत म्हणून तिने गुणगान करायचं आणि बाकीच्यांनी तल्लीन होऊन त्यावर माना डोलवायच्या! म्हणून बेचैन झालेल्या मोहनच्या रुपात आधुनिकतेनं परंपरावादाला दिलेलं हे उत्तर आहे,
*राम ही तो करुणा मे हैं-
दया हे उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. दया बाळगा, पोरी-बाळी आणि जे दलित लोक आहेत त्यांची दया येऊ द्या, त्यांना त्यांचे अधिकार द्या. राम तिथं आहेत.
*शांती में राम हैं-
आपल्या या उच-नीचतेमुळं खोट्या अहंकारामुळं भांडण-तंटे होतात. हे सोडा. वैयक्तिक-सामाजिक शांती प्रस्थापित करा.
राम तिथं आहेत.
ही वरची व पुढच्या ओळी एकमेकांशी जोडल्या आहेत.
*राम ही है एकता में-
भांडण-वाद नव्हते, सुसूत्रता होती, एकता होती म्हणून राम-वानरसेना रावण व राक्षस मारुन सीतेला आणू शकले. एकीचं बळ मोठं म्हणून सामाजिक ऐक्य पाहिजे. राम तिथं आहेत.
*प्रगती मे राम है-
शांती आहे. ऐक्य आहे. तर संकटांना समाज एकत्र सामोरा जाऊ शकतो, परस्परांना मदत करून पुन्हा उभा राहू शकतो, आणि प्रगती करु शकतो. राम तिथं आहेत.
*राम बस भक्तों नहीं, शत्रु के भी चिंतन में हैं-
भक्त तर देवाचं स्मरण करतच असतात पण रावण सीतेचं मन बदलावायचा प्रयत्न करताना स्वतःच रामाचा जप करतो. रावणाला सावधान करताना कुंभकर्णही रामाचं गुणवर्णन केल्याचं ऐकलं आहे, शत्रूगटातला तिसरा भाऊ बिभीषण तर सततच राम-नाम जपत होताच. बघा शत्रूच्या विचारात, राम तिथंही आहेत.
*देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं
  राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं-
खोटा अहंकार, अस्पृश्यता, जातीवाद, वैयक्तिक-सामाजिक प्रगतीसाठी न झटणे, मूलभूत प्रश्नांचा विचार न करणे "असेल माझा हरी/ ठेविले अनंते..." ही वृत्ती पापी आहे, रावणासारखी आहे. तिला सोडा. मग राम तिथं आहेत. राम मनामनांत आहेत. राम सर्वव्यापी आहेत
*राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं-
प्रत्येक घरात लोक शांती, समाधान, आनंदात राहत आहेत. घरात वातावरण चैतन्यमय आहे. घरातल्या बालगोपालांचं आणि अंगणातल्या तुळस व अन्य झाडांची म्हणजे पर्यायाने निसर्गाची निगा राखली जात आहे. घरात व अंगणात अंतर्बाह्य जिवंतपणा आहे. तिथं राम आहेत.
*मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं-
वैयक्तिक- सामाजिक दोष- दुर्गुण जे रावणासारखे आहेत ते काढून टाका, मग तुमच्यातच राम आहेत.
या गाण्यामध्ये बाकी आध्यात्म आपण ऐकत आलो आहोत, पण या ओळींमध्ये एक वेगळं तत्वज्ञान आहे. तेच समजून घेणं गरजेचं आहे.
         रामलीलेमध्ये हा प्रसंग बघून थोडा अस्वस्थ झालेला मोहन गावकरी लोकांच्या श्रद्धेला नावं ठेवणं, त्यांचा अकारण विरोध करणं, अपमान करणं असे उद्योग करत नाही तर आधी परंपरा पालन पूर्ण होऊ देतो मग त्यांचीच री ओढतो व त्याच्या अनुभवाला आलेलं तत्वज्ञान सगळ्यांसमोर सांगतो. बर हे फक्त त्याच दिवसापुरतं मर्यादित न ठेवता गावासाठी सर्वांना एकत्र आणून त्यांच्याच मदतीनं गावात विजेचा छोटा प्रकल्प उभा करतो, त्यांनतर तो भारतातच स्थायिक होतो, हे सिनेमा पाहिलेल्यांना माहीत आहे. खरं तर हा उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या समाजसेवक, बुद्धिजीवी लोकांसाठी छान उदाहरण आहे की प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावं.  
          म्हणूनच हे तत्वज्ञान समजून घेऊन ते अंगी बाणवलं जावं. कारण रामराज्य आपोआप येत नाही, त्यासाठी प्रत्येकवेळी राम येण्याचीही वाट पाहत बसू नये, आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. म्हणून जोवर आपल्यात राम आहे तोवर हाच ध्यास धरूया, त्याचसाठी झटूया!
तूर्तास राम राम!.!.! 🙏🏼🙏🏼🙏🏼.

मातृ दिनाच्या इतिहासाची कहाणी

                              प्रेम स्वरूप आई वात्सल्यसिंधु आई                  बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी                             ...